Skip to main content

बदलते 'राज'कारण

 ' ए लाव रे तो व्हिडिओ' ते 'उत्तर प्रदेश मध्ये विकास होतोय' इथपर्यंत आता महाराष्ट्राचं राजकारण फिरतंय.आपल्या भूमिका पहिल्यापासून ठामपणे मांडणारा व लोकांना आपलासा वाटणारा नेता हीच त्याची ओळख त्याने घर जरी बदललेले असले तरी लोकांना न्याय त्याच्या इथेच मिळणार यातच त्याचा विजय.सभांना होणारी मोठी गर्दी पण निवडणुकांवेळी हीच गर्दी मतांमध्ये फिरवू न शकणे हेच त्याचे दुर्दैव्य. कधीकाळी हाच शिवसेनेचा पुढील सर्वेसेवा होईल असे लोकांना वाटत होते पण नशिबाचे चक्र अशे जे फिरले आणि स्वतःचा नवीन पक्ष काढून जुन्या पक्षातल्या मोठ्या नेत्यांना न फोडता नवीन साथीदारांना घेऊन पुढे जाऊन 'जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र' घडवू असे ठामपणे मांडणारा नेता आज संघर्ष करतोय स्वतःच्या पक्षाला नवसंजीवनी देण्याचा.

सध्या तरी महाराष्ट्रातील तीन पक्ष एकसाथ गुण्या गोविंदाने नांदत असल्याचे दाखवत आहेत आणि शिवसेना जी स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष आहे असे बोलतो त्याची या महाविकासआघाडी मध्ये कोंडी झाल्याचे दिसते . महाविकास आघाडी मधील उर्वरित दोन्ही पक्ष हे सेक्युलॅरिझम या विचारधारा वर मत मागतात त्यामुळे त्यात शिवसेनेची मोठी अडचण झाली याचाच फायदा म्हणजे शिवसेनेची हिंदुत्वाची जागा मनसेला घ्यायची आहे.दोन वर्षा पूर्वी एक भली मोठी सभा घेऊन पक्षाच्या झेंडाचा रंग बदलून त्यांनी हिंदुत्वाची शाल अंगावर घेतली. काही मनसैनिकांनी तर राज ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट अशी उपाधी देऊन टाकली . त्यानंतर राज अयोध्या दौरा करणार अशा चर्चा होत्या पण कोरोना हा महाभयानक विषाणू आला आणि सगळं थोड्या वेळासाठी शांत झालं.सगळं जग या विषाणूमुळे त्रस्त होत तस महाराष्ट्रात पण अनेक समस्या लोकांना उदभवत होत्या. जेव्हा लॉकडाऊन हळू हळू संपत होत अनेक लोक समस्या घेऊन राज ठाकरे यांच्या कडे जात होते . राज्यात राज यांच सरकार नाही ते विरोधी पक्षात आहेत पण त्यांचा एकच आमदार आहे.तरीही लोक त्यांच्याकडे जातात आणि समस्या मांडतात.लोकांना वाटत राज यांचा स्वभाव पाहता आपली काम त्यांच्या कडे गेल्यावर पटकन होतील. एसटी कर्मचारी,डॉक्टर ,रेल्वे कर्मचारी किंवा सामान्य नागरिक असे अनेक लोक राज ठाकरे यांच्या घरी जाऊन आले.सध्या लोक जरी राज ठाकरे यांच्या सभेत जातात,त्यांच्या कडे अडचणी घेऊन जातात पण जेव्हा निवडणूक येतात तेव्हा मनसेला मत देत नाही.पक्षाचे हातावर मोजता येतील असे उमेदवार उभे राहतात, पक्षाचा जो मूळ असतो तो म्हणजे कार्यकर्ता तोच जमिनीवर काम करत नाही. पक्षाची संघनात्मक बांधणी जशी पाहिजे तशी नाही. एकच आमदार निवडून येतो तो पण दुसऱ्या पक्षाचा सहकार्यामुळे, अस म्हणता येईल. जो पक्ष याच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीमध्ये १३ आमदार निवडून आणतो तोच पक्ष आज अस्तित्वासाठी लढतो आहे.

आत्ताच झालेल्या गुढीपाडवा मेळावा मध्ये राज ठाकरे यांनी त्यांचा ज्वलंत हिंदुत्व लोकांसमोर मांडले.त्यामध्ये त्यांनी अनेक मुख्य विषयांना हाथ घातला मुख्यतः त्यांनी राष्ट्रवादी व शरद पवार हे कशे जातीवादीय आहेत यावर भर दिला.पवारांना त्यांनी थेट निशाणावर घेतल. पवार असो किंवा शिवसेनेचे संजय राऊत कोणालाच नाही सोडला.त्यांनी त्यांच्या ठाकरे शैलीत सगळ्यांचा समाचार घेतला पण ते भाषणातले जे शब्द होते ते राज यांचे वाटत नव्हते.जस राज यांचा भाषण रंगत तस ते भाषण रंगल नाही.जे मशिदी वरील भोंगे असतात त्यांचा समोर हनुमान चालिसा लावा अस थेट आवाहन त्यांच्या कार्यकर्त्यांना केल.पुढच्याच दिवशी काही मनसैनिकांनी भोंग्यांवर हनुमान चालीसा लावली. अनेक ठिकाणी कार्यकर्ते गोळा झाले पण पुण्यामधले मनसेचा चेहरा असलेले आणि राज यांचे विश्वासू शिलेदार वसंत तात्या मोरे यांनी असे म्हटले कि 'मी एक लोकप्रतिनिधी असल्याने व माझ्या प्रभागात मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव असल्याने मला काय भोंगे लावता येणार नाही'. राज ठाकरे यांचा आदेश काही अनेक मनसैनिकांना कळलाच नाही अनेक कार्यकर्ते संभ्रमात होते. ह्याच गोंधळात वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून गच्छन्ति झाली. व त्यांचे सहकारी साईनाथ बाबर याना पुणे शहर शहराध्यक्ष पदाची धुरा दिली.अस झाल असताना हि पण वसंत हे आपण मनसैनिक म्हणून काम करत राहणार असे बोलत होते. अनेक पक्षांनी त्यांना आपल्या पक्षात या अश्या ऑफर दिल्यात पण ते राज ठाकरे यांच्या सोबतच राहणार असे सांगत होते. सगळी कडे संभ्रम असल्याने राज अजून एक सभा घेणार असे त्यांनी जाहीर केले आई सभेला 'उत्तरसभा' असे नामकरण केले.त्यांची उत्तर सभा ठाणे येथील गडकरी रंगायतनच्या समोर झाली.सभेला मोठी गर्दीही झाली त्यांनी गुडीपाडवा मेळाव्यात जे मुद्दे मांडले त्याचा उदारणाशी स्पष्टीकरण दिले. नाराज झालेल्या पदाधिकाऱ्यांना समजावले व परत राष्ट्रवादी व शरद पवार यांना टार्गेट केल.त्याच बरोबर शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर ही टीका केली राज असे म्हणाले की संजय राऊत शिवसेनेचे कमी राष्ट्रवादीचेच जास्त वाटतात. राज यांनी संजय राऊत याना प्रबोधनकार ठाकरे यांचा शब्द असलेला 'लवंडू' हा शब्द संबोधिला. त्यांनी मुंब्रा मध्ये कशे आतंकवादी सापडतात ह्याची एक लिस्टच सभेत मांडली व जितेंद्र आव्हाड यांना तोंडावर पाडल.अशा प्रकारे जशी राज ठाकरे यांची सभा होते तशीच ही सभा पण संपली. राज यांच्या हिंदुत्ववादी राजकारणात घुसल्यामूळे महाराष्टाचे राजकारण राज ठाकरे यांच्या अवतीभवती फिरू लागले. आजच्या काळात सगळ्याच पक्षांना आरती असो व हनुमान चालिसा म्हणायला राज यांनी भाग पाडल.महाविकास आघाडी मध्ये असल्यामुळे शिवसेनेच मवाळ झालेलं हिंदुत्व यामुळे परत जहाल होताना दिसले. आपणच खरे हिंदुत्ववादी आहोत असे शिवसेना नेते सांगत सुटले.

थोड्याच दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये महापालिकेच्या निवडणूक होणार आहेत त्यामध्ये आता चुरशीची लढत होणार आहे हे नक्कीच. 

Popular posts from this blog

अडाणी कि अदानी ??

 खूप दिवस झाले सतत एकच नाव लोकांच्या अवती भवती फिरत आहे. कोणताही न्युझ चॅनेल लावा किंवा सगळ्या समाज माध्यमावर एकाच च नाव चर्चेत आहे. त्या माणसाचे संबंध सगळ्या मोठ्या नेत्या सोबत चांगले आहे.त्यांच्या संपत्ती मध्ये गेल्या दोन वर्षात जी वाढ झाली आहे ते बघून कोणाचे हि डोळे पांढरे होतील . आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यां बरोबर  तर  त्याचे खूपच चांगले आहे .आपले प्रधानमंत्र्याचे ते  लंगोटी यारच अस धरून चला . जेवढे चांगले संबंध प्रधानमंत्र्यांसोबत आहेत तेवढेच त्यांचे वाईट संबंध राहुल गांधी बरोबर आहे. सकाळ पासून रात्री पर्यंत काँग्रेसचे प्रिन्स  राहुल गांधी फक्त एकाच नावाचा जप करत असतात . आता तर ते नाव नाव फक्त राहुल गांधी यांना त्यांचा नावाचा टॅटूच काढायचा बाकी आहे. आता ते नाव म्हणजे थोड्या दिवसासाठी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम शांतीलाल  अदानी.  तर भारत  खूप वर्ष झाले टॉप वर फक्त अंबानी होते, टॉप वर म्हणजे श्रीमंतांच्या यादीत . मधेच दोन वर्ष पूर्वी एक नाव सतत लोकांच्या कानी पडू लागला ते म्हणजे गौतम अदाणी. बघायला गेला तर अदानी हे नाव गुजर...

खेळ मांडला

शिवसेना म्हंटलं कि पहिल नाव येत ते शिवसेना प्रमुख बाळ केशव  ठाकरे  उर्फ बाळासाहेब ठाकरे . त्यांचे भाषण, त्यांचे व्यक्त्तिमत्व, त्यांची देहबोली या साठी ते प्रसिद्ध होते . महाराष्ट्र स्थापन झाल्यांनतर मुंबईमध्ये  मराठी माणसाची गळचेपी मोठ्या प्रमाणात होत होती. अनेक मराठी तरुणांना नोकरी असो वा व्यवसाय त्यामध्ये दुय्यम वागणूक मिळत होती. हाच  अन्याय मोडून  काढण्यासाठी बाळ ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली  आणि मुंबई व महाराष्ट्र मध्ये ठाकरे पर्व चालू झाल.  मुंबईतील व त्याच्या परिसरातील सामान्य मुलांच्या मनात शिवसेना बद्द्ल आदर वाढू लागला आणि मोठ्या प्रमाणात युवक शिवसेनेमध्ये प्रवेश करू लागले. अनेक आंदोलन झाली शिवसेनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता पण निवडणुकी मध्ये पाहिजे तस यश मिळत नव्हत. मग आता शिवसेनेनं मराठी सोबत हिंदुत्त्व हि विचारधारा पण प्रखरपणाने मांडण्यास सुरवात केली.  १९८९ साली शिवसेनेनं भारतीय जनता पार्टी सोबत युती केली. दोन्ही पक्ष हिंदुत्वासाठी लढण्यासाठी एकत्र आले. शिवसेनेने त्यांच्या सुवर्ण काळात  पहिले  बंड बघितल ते छगन ...

काँग्रेस जोडो यात्रा...

 राजकारण हे नाव जरी आपल्या कानी पडल तर आपण लगेच चर्चेला तयार असतो. सध्या देशात अनेक राजकीय पक्ष राजकारण करत  आहे. देशातलाच नव्हे  तर जगातला सगळ्यात  मोठा पक्ष  म्हणजे भाजप हा आपल्या देशात  सत्ताधारी पक्ष आहे. सध्या भाजप त्याच्या सर्वोच शिखरावर्ती आहे. प्रत्येक निवडणूक ते जोमाने लढतात आणि जिंकतात सुद्धा.  याच आपल्या देशात असाच एक  पक्ष आहे तो त्याच्या अस्तित्वासाठी  लढत आहे. ज्या पक्षाने स्वातंत्र्या आधी लढा दिला आणि स्वातंत्र्या नंतर अनेक वर्ष  सत्तेत होता.  भारताच्या  विकासात त्याचे योगदान महत्वाचे आहे असा काँग्रेस पक्ष सध्या वाईट काळातून चालत आहे. तोच वाईट काळ दूर करण्यासाठी सध्या काँग्रेसचे नेते  राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा चालू केली आहे. काँग्रेस मध्ये गांधी घराणे जे काही करेल ते त्यांच्या पक्षात सगळ्यांना मान्य असत. त्यांच्या  वर आरोप सुद्धा होतो कि हा पारिवारिक पक्ष आहे. आणि काही अंशी हा आरोप खरा सुद्धा आहे. काँग्रेस मधल्याच लोकांना गांधी घराण्या बाहेरील नेतृत्व मान्य नाही. पण आता काँग्रेस मध्ये  अंत...