देशात सध्या फक्त हिंदू- मुस्लिम येवढच चाललंय. रामनवमी असो वा हनुमान जयंती असो दोन्ही दिवशी देशामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार दिसून आला. गेल्या काही काळातील काही घटना बघितल्या तर असा दिसून येईल कि देशात वातावरण काय आहे. तम्ही वर्तमानपत्र, टीव्ही चॅनेल्स पाहिलात तर तुम्हाला सगळीकडे हिंदू- मुस्लिम हिंसाचाराच्याच बातम्या दिसतील. अहो ताज उदाहरणच घ्याना, आताच दिल्लीच्या जहांगीरपुरी मध्ये झालेली दंगल. हनुमान जयंतीला निघालेल्या यात्रेमध्ये काही लोकांनी दगडफेक केली आणि दंगल उसळली.
पण या सगळ्या हिंदू- मुस्लिम च्या राड्यात बेरोजगारी आणि महागाई हे मुद्दे बाजूला पडले आहेत.सर्व राजकीय पक्ष मशिदीवरच्या भोंग्यावरुन, हिजाबवरून, हलाल मटनावरून दंगा करत आहेत. कोण म्हणतय तू जर भोंगा खाली घेतला नाही तर मी हनुमान चालीस लावेन तर कोण म्हणतय मी तुझ्यावर ईडी लावेन. काही नेत्यांच्या संपत्ती बघून डोळे पांढरे होतील अशी गत आली आहे आता. राज्यातले अनेक मंत्री तर थेट जेल मध्ये आहेत. काहींचा संबंध तर थेट दाऊद इब्राहिमशी आहे आणि एक जण तर १०० कोटी गोळा करण्याच्या आरोपावर जेल मध्ये गेला.२०१४ मध्ये ज्यांनी देशाला अच्छे दिनचे स्वप्न दाखवले ते सध्या काय करत आहेत ते त्यांनाच माहिती. सध्या केंद्रात असनाऱ्या एक महिला मंत्री १० वर्षा पूर्वी सिलेंडर घेऊन महागाई वर बोंबलत होत्या त्याच आज मूग गिळून गप्पं बसल्या आहेत.
धार्मिक वातावरण पेटवून हिंसाचार घडवणाऱ्या नेत्याला काय माहित या हिंसा घडवणाऱ्या झुंडीतले अनेक तरुण बेरोजगार आहेत. महागाईचे चटके तर सर्वसामान्यांनाच बसतात. नेते मंडळी तर धनाढ्य असतात त्यांना कसली पडली आहे महागाईची चिंता. म्हणून एकही राजकीय नेता महागाई, वीजटंचाई अन बेरोजगारीवर चकार शब्द काढत नाही. सगळ्या बातम्यांमध्ये महागाई व बेरोजगारीचे मुद्दे कायमच टाळले जातात किंवा दाखवलेच जात नाही. सध्या तरी भारतीय मीडिया ही बातमी सांगणारी नव्हे तर बातमी बनवणारी झाली आहे. काही रिपोर्टर तर खुलेआम कोणत्यातरी पक्षाची बाजू घेतात समजतच नाही पत्रकार कोण आहे आणि पक्षाचा प्रवक्ता कोण आहे. देशामध्ये तर दोन प्रकारचे पत्रकार झाले आहेत एक म्हणजे गोदि मीडिया दुसरी म्हणजे चाई बिस्कुट पत्रकार.
सध्या देशात दर वर्षाला वाढणारा महागाईचा दर प्रसिद्ध केला जातो. त्या नुसार, गेल्या मार्च २०२२ मध्ये ६.९५% इतका दर होता. जो ऑक्टोबर २०२० नंतरचा उच्चांक आहे. भारत सरकार तर्फे महागाईचा दार जास्तीत जास्त किती असावा यासाठी एक ठरवला गेला म्हणजे ६.२५% इतका ज्याची मर्यादा ओलांडली गेली आहे म्हणजेच देशात महागाईचा भडका उडाला आहे.खाद्य तेलाच्या किमतीचा दर ११.६४% आहे. मांस व मासे यांच्या किंमतीत तर पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जो लिंबू ५ रुपयाला दोन मिळायचे तेच आता १० रुपयाला मिळतात. तुम्ही म्हणाल यात काय पण जरा जाऊन तुमच्या आईला किंवा बायकोला विचारा कि भाज्यांचा भाव काय आहे तिने नाही महागाईचा पाढा वाचून दाखवला तर नवलच.
सलग ६ महिने झालेत अन्नधान्याच्या किंमती वाढतच चालल्या आहेत. कपडे आणि चप्पलाच्या महागाईचा दर ९.४% टक्के इतका आहे. पेट्रोल तर ११० रुपयाच्या खाली यायचा नावाचं घेत नाही. लोक या गोष्टी वर मीम्स बनवतात पण जेव्हा पेट्रोल पंपावर गेल्यावर जेव्हा खिशा खाली होतो तेव्हा रडायची पाळी येते .
याच अश्या महागाई असो व बेरोजगारी या विषयावर राजकीय पक्षांनी बोललं पाहिजे पण हे राजकीय पक्षांना तर लोकांच्यात धार्मिक तेढ निर्माण करून मत मिळवायची आहे आणि आपली पोळी शेकून घ्यायची आहे. त्यामुळे आपणच ठरवा तूम्हाला तुमच भविष्य भांडणात घालवायच आहे कि अजून कशात...