Skip to main content

Posts

अडाणी कि अदानी ??

 खूप दिवस झाले सतत एकच नाव लोकांच्या अवती भवती फिरत आहे. कोणताही न्युझ चॅनेल लावा किंवा सगळ्या समाज माध्यमावर एकाच च नाव चर्चेत आहे. त्या माणसाचे संबंध सगळ्या मोठ्या नेत्या सोबत चांगले आहे.त्यांच्या संपत्ती मध्ये गेल्या दोन वर्षात जी वाढ झाली आहे ते बघून कोणाचे हि डोळे पांढरे होतील . आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यां बरोबर  तर  त्याचे खूपच चांगले आहे .आपले प्रधानमंत्र्याचे ते  लंगोटी यारच अस धरून चला . जेवढे चांगले संबंध प्रधानमंत्र्यांसोबत आहेत तेवढेच त्यांचे वाईट संबंध राहुल गांधी बरोबर आहे. सकाळ पासून रात्री पर्यंत काँग्रेसचे प्रिन्स  राहुल गांधी फक्त एकाच नावाचा जप करत असतात . आता तर ते नाव नाव फक्त राहुल गांधी यांना त्यांचा नावाचा टॅटूच काढायचा बाकी आहे. आता ते नाव म्हणजे थोड्या दिवसासाठी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम शांतीलाल  अदानी.  तर भारत  खूप वर्ष झाले टॉप वर फक्त अंबानी होते, टॉप वर म्हणजे श्रीमंतांच्या यादीत . मधेच दोन वर्ष पूर्वी एक नाव सतत लोकांच्या कानी पडू लागला ते म्हणजे गौतम अदाणी. बघायला गेला तर अदानी हे नाव गुजर...
Recent posts

काँग्रेस जोडो यात्रा...

 राजकारण हे नाव जरी आपल्या कानी पडल तर आपण लगेच चर्चेला तयार असतो. सध्या देशात अनेक राजकीय पक्ष राजकारण करत  आहे. देशातलाच नव्हे  तर जगातला सगळ्यात  मोठा पक्ष  म्हणजे भाजप हा आपल्या देशात  सत्ताधारी पक्ष आहे. सध्या भाजप त्याच्या सर्वोच शिखरावर्ती आहे. प्रत्येक निवडणूक ते जोमाने लढतात आणि जिंकतात सुद्धा.  याच आपल्या देशात असाच एक  पक्ष आहे तो त्याच्या अस्तित्वासाठी  लढत आहे. ज्या पक्षाने स्वातंत्र्या आधी लढा दिला आणि स्वातंत्र्या नंतर अनेक वर्ष  सत्तेत होता.  भारताच्या  विकासात त्याचे योगदान महत्वाचे आहे असा काँग्रेस पक्ष सध्या वाईट काळातून चालत आहे. तोच वाईट काळ दूर करण्यासाठी सध्या काँग्रेसचे नेते  राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा चालू केली आहे. काँग्रेस मध्ये गांधी घराणे जे काही करेल ते त्यांच्या पक्षात सगळ्यांना मान्य असत. त्यांच्या  वर आरोप सुद्धा होतो कि हा पारिवारिक पक्ष आहे. आणि काही अंशी हा आरोप खरा सुद्धा आहे. काँग्रेस मधल्याच लोकांना गांधी घराण्या बाहेरील नेतृत्व मान्य नाही. पण आता काँग्रेस मध्ये  अंत...

खेळ मांडला

शिवसेना म्हंटलं कि पहिल नाव येत ते शिवसेना प्रमुख बाळ केशव  ठाकरे  उर्फ बाळासाहेब ठाकरे . त्यांचे भाषण, त्यांचे व्यक्त्तिमत्व, त्यांची देहबोली या साठी ते प्रसिद्ध होते . महाराष्ट्र स्थापन झाल्यांनतर मुंबईमध्ये  मराठी माणसाची गळचेपी मोठ्या प्रमाणात होत होती. अनेक मराठी तरुणांना नोकरी असो वा व्यवसाय त्यामध्ये दुय्यम वागणूक मिळत होती. हाच  अन्याय मोडून  काढण्यासाठी बाळ ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली  आणि मुंबई व महाराष्ट्र मध्ये ठाकरे पर्व चालू झाल.  मुंबईतील व त्याच्या परिसरातील सामान्य मुलांच्या मनात शिवसेना बद्द्ल आदर वाढू लागला आणि मोठ्या प्रमाणात युवक शिवसेनेमध्ये प्रवेश करू लागले. अनेक आंदोलन झाली शिवसेनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता पण निवडणुकी मध्ये पाहिजे तस यश मिळत नव्हत. मग आता शिवसेनेनं मराठी सोबत हिंदुत्त्व हि विचारधारा पण प्रखरपणाने मांडण्यास सुरवात केली.  १९८९ साली शिवसेनेनं भारतीय जनता पार्टी सोबत युती केली. दोन्ही पक्ष हिंदुत्वासाठी लढण्यासाठी एकत्र आले. शिवसेनेने त्यांच्या सुवर्ण काळात  पहिले  बंड बघितल ते छगन ...

हिंदुत्वाचा राखणदार ...

 उठा उठा सकाळ झाली अयोध्याला निघायची वेळ आली.आजच्या दिवशी जो तो उठतो आहे आणि तो अयोध्याला जात आहे.अयोध्या म्हणजे एक अस शहर झाला आहे कि तेथे जगाच्या सगळ्या सुखसोयी मिळणार आहे.सध्या देशात आणि विशेषतः महाराष्ट्रमध्ये अयोध्याला एक विशेष महत्व मिळाले आहे . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची शाल अंगावर घेतली आणि अयोध्या दौरा करणार याची घोषणा केली. बघा ना हेच जर तुम्ही दहा दहावर्षा पूर्वी  ऐकलं असत तर तुम्हाला विश्वास बसला नसता.यांच्या  पाठोपाठ आता महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पण अयोध्या दौरा ला जाणार आहे असे शिवसेनेने घोषित केले आहे . पण आजच्या घडीला हेच सत्य आहे. आता ज्यांना राजकारणातला थोड फार माहित असेल त्यांना समजेलच कि ते तिथे का चाललेले आहेत.त्यांनी हिंदुत्व हि विचारधारा स्वीकारली असून त्या वरच ते आता राजकारण करणार हे स्पष्ट झालं आहे . धर्म आणि राजकारण  चा नातं अतूट आहे. राजकारण मध्ये या मुद्या शिवाय मत मागताच येत नाही. बघा ना केंद्रात असलेलं भाजप सरकार म्हणत आम्हीच खरे हिंदुत्ववादी आणि आणि महाराष्ट्र मध्ये असललेली शिवस...

दिवाळखोर लंका..

 श्रीलंका हे नाव ऐकल्यावर आपल्याला आठवतो तो म्हणजे रावण, पुराण काळात रावणाची लंका हि सोन्याची लंका म्हणून ओळखली जायची.हे झालं पुराण काळाच तेव्हा असा म्हणत होते पण सध्या अस म्हणता नाही येणार याला तशीच कारण पण आहेत. श्रीलंका हा देश सध्या आर्थिक संकटामध्ये आहे  श्रीलंका आज गरिबीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. येथे महागाई गगनाला भिडली आहे. देशभरात वीजपुरवठा खंडित झाला आहे. विजेअभावी रुग्णांच्या आवश्यक शस्त्रक्रियाही रुग्णालयात होत नाहीत, कारखाने बंद, पेपर कमी असल्याने परीक्षा रद्द, रेल्वे-बसची वाहतूक ठप्प झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तेलाचा अभाव.. पुरवठा साखळी पूर्णपणे कोलमडली आहे, घरातील चुल बंद झाल्या आहेत आणि खाण्यापिण्याच्या तुटवड्यामुळे दुकानांमध्ये लूट सुरू झाली आहे.श्रीलंकेत तांदळाचे दर 250 रुपये किलो, गहू 200 रुपये किलो, साखर 250 रुपये किलो, खोबरेल तेल 900 रुपये आणि दूध पावडर 200 रुपये किलो दराने विकली जात आहे. 2000 प्रति किलो. देशाच्या या स्थितीसाठी लोक फक्त श्रीलंकेच्या राजपक्षे सरकारला जबाबदार मानत आहेत.त्यांच्या विरुद्ध श्रीलंकेमध्ये अनेक ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणा...

महागाईचा भोंगा

 देशात सध्या फक्त हिंदू- मुस्लिम येवढच चाललंय. रामनवमी असो वा हनुमान जयंती असो दोन्ही दिवशी देशामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार दिसून आला. गेल्या काही काळातील काही घटना बघितल्या तर असा दिसून येईल कि देशात वातावरण काय आहे. तम्ही वर्तमानपत्र, टीव्ही चॅनेल्स पाहिलात तर तुम्हाला सगळीकडे हिंदू- मुस्लिम हिंसाचाराच्याच बातम्या दिसतील. अहो ताज उदाहरणच घ्याना, आताच दिल्लीच्या जहांगीरपुरी मध्ये झालेली दंगल. हनुमान जयंतीला निघालेल्या यात्रेमध्ये काही लोकांनी दगडफेक केली आणि दंगल उसळली.  पण या सगळ्या हिंदू- मुस्लिम च्या राड्यात बेरोजगारी आणि महागाई हे मुद्दे बाजूला पडले आहेत.सर्व राजकीय पक्ष मशिदीवरच्या भोंग्यावरुन, हिजाबवरून, हलाल मटनावरून दंगा करत आहेत. कोण म्हणतय तू जर भोंगा खाली घेतला नाही तर मी हनुमान चालीस लावेन तर कोण म्हणतय मी तुझ्यावर ईडी लावेन. काही नेत्यांच्या संपत्ती बघून डोळे पांढरे होतील अशी गत आली आहे आता. राज्यातले अनेक मंत्री तर थेट जेल मध्ये आहेत. काहींचा संबंध तर थेट दाऊद  इब्राहिमशी आहे आणि एक जण तर १०० कोटी गोळा करण्याच्या आरोपावर जेल मध्ये गेला.२०१४ मध्ये ज्यांनी...

बदलते 'राज'कारण

 ' ए लाव रे तो व्हिडिओ' ते 'उत्तर प्रदेश मध्ये विकास होतोय' इथपर्यंत आता महाराष्ट्राचं राजकारण फिरतंय.आपल्या भूमिका पहिल्यापासून ठामपणे मांडणारा व लोकांना आपलासा वाटणारा नेता हीच त्याची ओळख त्याने घर जरी बदललेले असले तरी लोकांना न्याय त्याच्या इथेच मिळणार यातच त्याचा विजय.सभांना होणारी मोठी गर्दी पण निवडणुकांवेळी हीच गर्दी मतांमध्ये फिरवू न शकणे हेच त्याचे दुर्दैव्य. कधीकाळी हाच शिवसेनेचा पुढील सर्वेसेवा होईल असे लोकांना वाटत होते पण नशिबाचे चक्र अशे जे फिरले आणि स्वतःचा नवीन पक्ष काढून जुन्या पक्षातल्या मोठ्या नेत्यांना न फोडता नवीन साथीदारांना घेऊन पुढे जाऊन 'जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र' घडवू असे ठामपणे मांडणारा नेता आज संघर्ष करतोय स्वतःच्या पक्षाला नवसंजीवनी देण्याचा. सध्या तरी महाराष्ट्रातील तीन पक्ष एकसाथ गुण्या गोविंदाने नांदत असल्याचे दाखवत आहेत आणि शिवसेना जी स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष आहे असे बोलतो त्याची या महाविकासआघाडी मध्ये कोंडी झाल्याचे दिसते . महाविकास आघाडी मधील उर्वरित दोन्ही पक्ष हे सेक्युलॅरिझम या विचारधारा वर मत मागतात त्यामुळे त्यात शि...